Tuesday, November 1, 2011

याचसाठी का केला होता अट्टाहास?

आजकाल खूप वेळा मला असा अनुभव येऊ लागलाय की ज्या गोष्टीसाठी खूप आतुरतेने वाट बघितलेली असते ती गोष्ट प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्यावर तितक समाधान नाही झालं. म्हणजे ती गोष्ट निश्चित चांगली असते, आवडलेली असते पण काहीतरी missing आहे असं वाटत राहत किंवा तो अनुभव जेवढा कल्पिला होता तितका अविस्मरणीय(exciting) नाही होत!


बऱ्याच बाबतीत होत असं - एखाद्या रेस्टॉरंट/ठिकाणा बद्दल खूप तारीफ ऐकलेली असते, पण तिथे गेल्या नंतर खूप वेगळा, नवीन अनुभव आल्यासारखं नाही वाटत! काही दिवसांनी आठवताना छान वाटत पण! :) Audi मध्ये बसण्याचा योग आला होता, गाडी आवडलीच पण त्याच्या अगोदर(किंबहुना आता सुद्धा रस्त्यावर गाडीकडे बघताना) जितकं छान वाटत होत तितक नाही वाटलं. तीच गोष्ट काही चित्रपट/पुस्तक, गायक/कलाकार यांच्याबाबतीत सुद्धा झाली :)

ह्याची काही कारणे मला वाटतात - पहिले म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल खूप कौतुक ऐकताना, त्याची एक प्रतिमा तयार होत असते आणि कदाचित ती प्रतिमा खूपच भव्य-दिव्य असते, त्यामुळे प्रथमदर्शनी थोडासा भ्रमनिरास झाल्यासारखे वाटते :) सापेक्षपणे बघता ती गोष्ट चांगली असतेच, पण 'first impression' च्या वेळी आपल्या मनातील प्रतिमेशी जुळत नसल्याने त्याचा पूर्ण आनंद नाही घेऊ शकत.
किंवा असंही असेल की माझ्या अपेक्षा खूप अवास्तवी होताहेत! दरवेळचा अनुभव हा अविस्मरणीयचं असेल असं नाही ना! 

कधी कधी असं वाटत की माझा पेला निश्चित भरलेला नाही, मग मी तो उपडा करून ठेवलाय का, की ज्यामुळे माझ अनुभव-विश्व समृद्ध करण्याच्या वाटा बंद करून टाकल्या आहेत? की नवीन काही आत्मसात करण्याची माझी क्षमताच उरलेली नाही आहे... 

एका प्रसिद्ध विधानाचा आधार घेऊन सांगावस वाटतंय की अशी एखादी सुंदर गोष्ट मिळण्याआधी आपण जी काही स्वप्न रंगवलेली असतात तीच जास्त सुखावह असतात! ती गोष्ट कधी कधी क्षणभंगुर ठरते पण आधीची ती ओढ/हुरहूर, ती साध्य करण्यासाठीचा प्रवास/धडपड, ती स्वप्नं ह्यातच जास्त आनंद मिळतो. :)

तुम्हाला काय वाटतं? तुमचा काही अनुभव?

Tuesday, April 26, 2011

खाण्यासाठी जन्म आपुला :) - भाग १

गेली बरेच वर्षे बाहेर राहत असल्यामुळे इच्छा असो वा नसो, बाहेर खाणं होतंच. त्यामुळे असंच मनात आलं की आपले अनुभव टाकून द्यावेत blog वर, झालाच तर कुणाला फायदा होईल म्हणा :)

बरेच दिवस माझ्या डोक्यात घोळ चालू होता की ही list, area नुसार बनवावी की item नुसार :)

बघू काय होतंय!

मिसळ साठी पुण्यात मला खूप आवडेल असं ठिकाण सापडायचं आहे :) त्यातल्या त्यात बरी ठिकाणे:

  • काटा किर्र: कर्वे रोड वर नळस्टॉप कडून डेक्कन ला जाताना डाव्या हाताला गरवारे कॉलेजच्या समोरच हे टपरी सदृश हॉटेल आहे. नीट पाहिलं नाही तर लक्षात नाही येणार. बऱ्याच ठिकाणी ह्याच कौतुक वाचायला मिळेल. (संध्याकाळी बंद असते) तशी चांगली असते मिसळ. तिखट/मेडियम/लाईट असे ३ प्रकार सर्व प्रकारच्या खवय्यांना आकर्षित करण्यासाठी ठेवले आहेत. मला इथे न आवडणारी गोष्ट म्हणजे 'पाव'! मला मिसळ सोबत 'स्लाईस'च आवडते, आणि इथे कोल्हापुरी मिसळ म्हणून सुद्धा पाव देतात! (हो, कोल्हापूर मध्ये वडा पाव, मिसळ पाव ह्या सोबत 'स्लाईस' दिली जाते, हॉटेल ब्रेड म्हणून लादी मिळते, गोड नसते :) ह्या गोष्टींमध्ये पाव दुय्यम असतो, पुण्या मुंबई मध्ये पावच इतका मोठ्ठा की खरी चव कळत नाही :D )
  • रामनाथ: टिळक रोड वर दुर्वांकुर कडून एस.पी. च्या दिशेने थोडस पुढे गेल की डाव्या हातालाच आहे. हॉटेल(!) बघून आत जाण्याच धाडस झालं तर तुम्ही खरे मिसळ प्रेमी! :) Ambience वगैरे गोष्टी बघणार असाल तर इकडे फिरकू नका, पुढे एक पर्याय देईन तुम्हाला :) मस्त तिखट मिसळ असते इथली, आवडली!
  • श्रीकृष्ण: तुळशीबागे मध्येच आहे! पण घाबरू नका, अगदी त्या गर्दीत शिरावं नाही लागत म्हणा. शनिपाराकडून(चितळे मिठाई) मंडई कडे जाताना डावीकडे एक बोळ दिसतो, तिथे नजर टाकल्यास बरीच गर्दी दिसेल, मग ओळखायच हे अतृप्त आत्मे श्रीकृष्ण मध्ये मिसळ खाण्यासाठीच थांबले आहेत! मला ह्या पुण्यातील मिसळ च्या चवीबाबत खूप काही सांगण्यासारखं वाटत नाही! ओके असतात.
  • श्री उपहारगृह: लक्ष्मी रोड वरून जयहिंद च्या शेजारून जाणाऱ्या वन-वे मधून सरळ १ चौक पुढे गेल की डावीकडे आहे.
  • बेडेकर: नारायण पेठ. ह्यांच तर खूप कौतुक ऐकल होत, पण प्रचंड निराशा झाली. माझ्या डोक्यात मिसळ म्हणजे कोल्हापुरी मिसळ, हे फिट्ट आहे, त्यामुळे ही आंबट गोड पुणेरी मिसळ झेपली नाही.
  • शर्वरी: एक unusual ठिकाण म्हणजे एफ.सी. रोड वरच शर्वरी(शबरी). घोले रोड च्या कॉर्नरला हे माझे आवडते restaurant आहे. इथल्या सर्वच डिशेस बेस्ट असतात! :) एखाद्या decent ठिकाणी फॅमिली सोबत मिसळ खायची असेल तर उत्तम पर्याय! थोडस महाग आहे इथे, पण overall taste, ambience साठी चालून जात!
  • खेड शिवापूर ला कैलास भेळ च्या शेजारी एकदा मिसळ खाल्ली होती! जाळ झाला होता :) परत जायचं राहून गेलंय! भुईंज जवळच 'विरंगुळा' पण सही आहे.
माझा सगळ्यात आवडता खाद्यप्रकार; कधीही खाऊ शकणारा म्हणजे 'पोहे'! पुण्यातले एक नंबर पोहे 'बिपीन स्नॅक्स' कडेच! कर्वे रोड डेक्कन साईडला जिकडे संपतो तिकडे सह्याद्री हॉस्पिटल च्या शेजारी ही टपरी आहे. इथे जाऊन फक्त १ डिश खाऊन आलात तर तुम्ही खवय्ये सोडाच, माणूस'प्राणी' पण नाहीत :D इथले सर्व प्रकार अप्रतिम असतात - वडा चटणी(पाव मला आवडत नाही ना ;-) पण छान असतो वडा पाव सुद्धा), उपमा, शिरा, साबुदाणा खिचडी(काकडी), ब्रेड पॅटिस(पण पॅटिस साठी ह्याच्यापेक्षा भारी एक ठिकाण आहे - डांगी पॅटिस!). Business policy म्हणा की अजून काही, इथल्या प्लेट्स अशा आहेत की एका प्लेट ने तुमची फक्त भूक चाळवली जाते, आणि आपसूक तुम्ही पुढची प्लेट मागवता!
ह्याचा एकच negative point म्हणजे रविवारी बंद असते! :-(

South Indian snacks साठी मला विशेष आवडत म्हणजे स्टेशन जवळच 'अक्षय'! त्याशिवाय
एफ.सी. रोड वरच 'शर्वरी' आहेच कुठल्याही snacks साठी. अरे हां, 'अभिषेक व्हेज' कस विसरू शकतो मी :) मेहेंदळे गॅरेज समोर आहे. इथला उत्तप्पा खूपच सही होता, आणि इथली कॉफी मला जाम आवडते! कधी जेवायचा योग बाकी आला नाही. :)
कँपात SGS mall च्या समोरच 'Coffee house' चांगलं आहे.
डोश्यासाठी कधीही जायला तयार असं ठिकाण म्हणजे 'मानकर डोसा'! ह्यांच्या २-३ शाखा आहेत. मी करिष्मा सोसायटी च्या इथलाच खाल्ला आहे. सातारा रोडचा बराच प्रसिद्ध आहे.
'स्टिमी अफेअर'
मधले इडलीचे नानाविध प्रकार निश्चित ट्राय करण्यासारखे आहेत. (शाखा: संभाजी उद्यान, कर्वे रोड, दुर्गाच्या शेजारी)
 
वैशाली, रुपाली जरी प्रचंड famous असल तरी मला खूप काही वेगळी टेस्ट वाटली नाही. 'दुर्गा'च पण तसंच, मला इथल्या कोल्ड कॉफीसह काहीच आवडत नाही.

थोडासा वेगळा मेनू try करायचा असेल तर डेक्कनचं 'गुडलक कॅफे' मस्त आहे :) बनमस्का चहा असो किंवा बन आॅमलेट! इथे ब्रेकफास्ट करून बाणेरला ऑफिसला जाणे म्हणजे स्वर्ग होता :D
असंच ब्रेकफास्ट साठी उत्तम ठिकाण म्हणजे लॉ कॉलेज रोडच 'कृष्णा'. 'कोबे सिझलर' च्या समोरच आहे. इकडे दररोज buffet ब्रेकफास्ट पण असतो.


मी 'डांगी
पॅटिस' चा उल्लेख केला ना वरती, तर ते off सेनापती बापट रोड आहे :) सिम्बायोसिस कडून चतुःशृंगीला जाताना दुसऱ्या सिग्नलला उजवीकडे दीप बंगला चौकाकडे जो रस्ता जातो तिथे डाव्या हाताला आहे. अस्सल पुणेरी बाणा जपत ठराविक वेळेतच 'माल शिल्लक असेपर्यंतच' पॅटिस मिळतात! पण ते खाल्ल्यानंतर सगळे गुन्हे माफ :) इथले टायमिंग सकाळी ८-१० आणि संध्याकाळी ४-६ आहे. रविवारी फक्त सकाळी.

University साईडला भटकत असाल तर युनिवर्सिटी कॅम्पस मध्ये एक टपरी आहे, तिकडे पण सकाळ संध्याकाळ नाश्ता छान असतो, विशेषतः उपमा. थोडा महाग वाटला मला कॅम्पसच्या मानाने. (मला आठवताहेत सांगलीच्या आमच्या वालचंद कॉलेजच्या बाहेरचे मंजूचे पोहे आणि गणेशची मिसळ! का आठवण काढली, आता तिकडे जावसं वाटतंय! :p )

एवढे सगळे नाश्ता/
स्नॅक्स चे प्रकार झाल्यावर भेळ/पाणी-पुरी ला डावलणे कसे शक्य होईल! मला in general पुण्यातील भेळ आवडली नाही. बरीच लोकप्रिय ठिकाणं try करून झाली पण गुण आला नाही :D त्यातला त्यात चांगली भेळ म्हणजे कमला नेहरू पार्कच्या गेटच्या डाव्या हाताला जी गाडी आहे(संगीता भेळ) तिकडे आवडली मला. पाणीपुरी इ. पण चांगले असते. 'मनमीत'(एफ.सी.) ची पाणीपुरी आणि 'बास्केट चाट' लाजवाब असत :)
एम.जी. रोड वर - Marzorin आणि Pasteur.
मार्झोरीनला सॅंडविच बेस्ट असतात; Whole wheat variety असते. वरती गॅलरी मध्ये बसून छान TP होतो :p
Pasteur कडे चाट,पाणीपुरी चांगल असत. आणि इथला thick milk shake चक्क खावा लागतो :)
East street cafe ला पण चव चांगली आहे.

तसा मी काही चहाबाज नाही, पण चहासाठी आवडलेलं ठिकाण म्हणजे मोतीबाग तालीम/अहिल्यादेवी शाळेच्या समोरील(शनिवार पेठ) अमृततुल्य! मला सुद्धा चहा प्यायची इच्छा होते तिकडून जाताना :D

अजून बरीच ठिकाणं try करायची आहेत तशी! टिळक रोड(हिराबाग चौक) वर मिळणारा साबुदाणा वडा, SP कॉलेजच्या शेजारची टपरी, प्रभा मधली मिसळ, वहुमन कॅफे आणि खूप काही :) ....
सुरुवात केली लिहायला आणि लक्षात आलं की snacks items वर खूप मोठी पोस्ट होतेय म्हणून पहिल्या भागात फक्त तेवढच लिहितोय.(किती अंत बघायचा तो वाचणाऱ्यांचा!!! उगाच वाचताहेत म्हणून लिहीतच सुटायचं का :D )
आता इथेच थांबतो! दुसरा भाग लंच/डिनर साठी लवकरच लिहीन! Patience असेल तर भेटूच ;-)

'सहेला रे'

'सहेला रे' हा एक सुंदर कार्यक्रम काही दिवसांपूर्वी (फेब्रुवारी मध्ये) झाला होता. त्यादिवशी मी अक्षरशः out of this world होतो! त्या रात्रीच हे लिहून ठेवलं होत पण पोस्ट कराव की नको कळत नव्हत :) करून टाकतो आता एकदाचं! :D

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका अप्रतिम संगीत महोत्सवाला उपस्थिती लावण्याचा योग ह्या वीकेंडला आला. योगच तो, कारण शुक्रवार रात्रीपर्यंत माझं घरी (न) जाण्याच निश्चित नव्हतं त्यामुळे सगळ अधांतरीच होत. किशोरीताईंना वसंतोत्सव मध्ये ऐकण्याची संधी ३ वर्षांपूर्वी मी गमावली होती त्यामुळे ती हुरहूर होतीच. :)
अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. संगीतातले वेगवेगळे प्रवाह एकत्र आणून एक वेगळा अनुभव देण्याचा त्यांचा प्रयत्न खूपच छान होता. यामागची भूमिका विशद करणारा त्यांचा लेख इथे पहा.

किशोरीताईंच्या सत्काराला ३ पिढ्यांमधली वेगवेगळ्या घराण्यातली दिग्गज मंडळी उपस्थित होती. अभूतपूर्व असा सोहळा होता तो. ताईनी श्रोत्यांना वंदन केल आणि सांगितलं की हेच माझे दैवत आहेत, सगळ्यांचे डोळे पाणावले होते त्या हृद्य प्रसंगी.

सुरुवात झाली शनिवारी संध्याकाळी उस्ताद अमजद आली खां यांच्या सरोद वादनाने. १-२ महिन्यात परत त्यांना ऐकणं म्हणजे पर्वणीच होती :)
वेगवेगळ्या घराण्याच्या गायकांचे एकत्रित गायन, विविध वाद्यांचा एकत्रित मिलाफ अशी अपूर्व पर्वणीच रसिकांना मिळाली होती. त्यामुळेच रुद्रवीणेसारख वेगळ वाद्य, 'नॅन्सी' कुलकर्णी यांच व्हायोलीन सदृश वाद्य, कौशिकी चक्रवर्तींच बहारदार गायन, आणि सतार, संतूर व बासरी यांचा एकत्रित आविष्कार असे विविध कलाविष्कार अनुभवता आले! 
कौशिकी चक्रवर्तींच गाणं खूपच आवडल. त्यासोबत त्यांच्या वागण्या बोलण्यातील मार्दव, नम्रता सुद्धा! :) (त्यांचा कार्यक्रम पुण्यात असल्यास मला सांगा. दगडूशेठ महोत्सवात ह्या वर्षी होत्या, पण मी नाही जाऊ शकलो.)

या सोहळ्याची सांगता झाली अशाच एका भन्नाट कल्पनेने. दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय तालवाद्यांची जुगलबंदी नव्हे तर एकाच तालाकडे जाण्याचा मंत्रमुग्ध करणारा प्रवास असंच त्याच वर्णन कराव लागेल!
माईक/स्पीकर टेस्टिंग म्हणजे प्रेक्षकांना एरवी कंटाळवाण्या वाटणाऱ्या प्रकारामध्ये झाकीर हुसेननी श्रोते, कलाकार, तंत्रज्ञ यांची फिरकी घेत छान माहौल तयार केला.
झाकीर हुसेन यांचा तबला आणि साबीर खान यांची सारंगी पहिल्यांदाच ऐकत होतो.
विकू विनायकराम या ज्येष्ठ कलाकाराचं घटम, त्यांचा मुलगा व्ही. सेल्वागणेश आणि नातू स्वामिनाथन यांच खंजिरा आणि सोबतीला कर्नाटकी गायन; क्या बात है! :)

भवानीशंकर यांच 'गजराजाच्या' चालीप्रमाणे भासणारे पखवाज वादन तर लाजवाब!
साबीर खान यांनी टेस्टिंगच्या वेळी सारंगी वरून बोटे फिरवली आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला :) आणि ही तर फक्त सुरुवात होती! त्यानंतर प्रत्येक वाद्याच्या तुकड्या नंतर नुसता टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस चालू होता. उपस्थित सर्व श्रोते निव्वळ भारावून गेले होते. घटम कडे बघून तोंडात बोटे घालणेच बाकी होते! मला तर भीती वाटत होती की हा घडा फुटत कसा नाही :p
खंजिरा(kanjira) म्हणजे तर एक आश्चर्यच आहे. एवढूस्से वाद्य आहे ते, काय कौशल्य लागत असेल त्यातून इतके वेगवेगळे ध्वनी निर्माण करायला! Simply amazing!!! 
या दोन्हीच्या सोलो नंतर मध्येच पखवाज ची दमदार थाप एक वेगळाच नाद निर्माण करत होती :) अशी दमदार थाप भवानीशंकरच देवोत!
आणि तरीसुद्धा या सर्व वाद्यात उस्तादांचा तबल्यावरचा ठेका वेगळाच sharpness घेऊन येत होता! Distinctly remarkable!

ह्या संपूर्ण कार्यक्रमात एक क्षण देखील मला उसंत मिळाल्याचं आठवत नाही! एकदम भारावून गेलो होतो कार्यक्रम संपताना आणि सर्व श्रोत्यांची अशीच इच्छा होती की हा जादुई स्वरांचा वर्षाव असाच अखंड चालू राहावा! शेवटची जुगलबंदी अशी काही रंगली होती की सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात वन्स मोर ची मागणी केली पण उस्तादांनी त्यांच्या मजेशीर शैलीत सांगितलं की सर्वांचीच कशी दमछाक झाली आहे :)
 

मुळात 'सहेला रे' ही ताईंची स्वरचित बंदिश जितकी सुरेख आहे तितकाच सुरेख कार्यक्रम आयोजित करून ते शीर्षक समर्पक ठरवलं! 

आम्ही सर्वजण परत असा योग कधी येईल याचा विचार करत बाहेर निघालो ते त्या अद्वितीय कार्यक्रमाच्या सुंदर आठवणी सोबत घेऊन आणि कानामध्ये ते रम्य सूर साठवून... 


संयोजकांना ह्या सुंदर अनुभवाबद्दल जितके धन्यवाद द्यावेत तितके थोडेच आहेत. असेच सुंदर कार्यक्रम भविष्यात ऐकायला मिळोत ही इच्छा :)

Wednesday, January 5, 2011

एका तळ्यात होती ...

काल सारेगमप little champs बघत होतो. आधीच्या पर्वाशी नकळत तुलना होतेच पण आताचे स्पर्धकसुद्धा चांगले आहेत. शरयू दातेने 'एका तळ्यात होती' म्हटलं.
मला हे गाणं खूप आवडत. गदिमांचे अगदी साधे
पण अर्थपूर्ण शब्द, श्रीनिवास खळेंची मोहक चाल आणि आशाताईंचा नितांतसुंदर आवाज! एक अफलातून combination आहे. 
 
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे पिल्लूं तयांत एक

सुरुवातीला ह्या दोन ओळीच माहित होत्या. आणि २-४ वर्षांपूर्वी कधीतरी रेडीओवर ऐकल संपूर्ण गाणं.

कोणी न त्यास घेई खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरुप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरुप वेडे पिल्लू तयांत एक

ही कडवी पहिल्यांदा ऐकल्यावर मी थोडासा उदास, खट्टू झालो होतो आणि अजूनही ऐकताना त्या पिलाविषयी वाईट वाटत...


एके दिनी परंतू पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्‍यासवे पळाले
पाण्यात पाहतांना चोरुनियां क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक
 
पण ह्या ओळी ऐकल्यावर एकदम खुश होतो आणि मूड पालटतो! नेहमी हे गाणं ऐकताना माझी अशीच अवस्था होते, शेवटच्या ओळी ऐकल्या की छान वाटत आणि आपोपाप चेहऱ्यावर हसू उमटत :)

मला वाटत गदिमांनी खूप साध्या आणि सरळ शब्दात एक सुरेख विचार सांगितला आहे.
हे गाणं ऐकल्यावर वाटत की सुंदर-कुरूप, शहाणं-वेडं ह्या सर्व कल्पना खूप सापेक्ष आहेत. आपल्यापेक्षा कोणी वेगळ करायला लागल की लोक त्याला
वेडं ठरवून रिकामे होतात!
प्रवाहाच्या विरुद्ध जाणाऱ्याला नेहमीच अवहेलना सोसावी लागते. त्यामुळे आपण बरोबर असलो तरी बाकीच्या लोकांपेक्षा वेगळे आहोत म्हणून आपल्याला वाटत की अरे आपणच चुकीचे आहोत की काय! ('What is right is not always popular and what is popular is not always right.')

पण असा एखादा क्षण येतो त्यावेळी
त्या पिल्लाला स्वतःची खरी ओळख पटते, की खर तर तो एक राजहंस आहे आणि म्हणून तो वेगळा आहे! त्याने आपली पाण्यातली प्रतिमा सुद्धा चोरून क्षणभरासाठीच पाहिलेली असते; कारण सर्वांनी त्याचं इतक खच्चीकरण केलेलं असत की स्वतःकडे बघायची सुद्धा त्याला भीती वाटत असते. त्यामुळे तो self-realization चा क्षण खूप महत्वाचा. आणि ही गोष्ट दुसऱ्या कोणी सांगण्यापेक्षा स्वतःलाच उमजण गरजेचे आहे! कालांतराने जगाला अस्सल काय आहे ते कळते पण ज्यावेळी इतरांच्या हेटाळणीमुळे आपण नाउमेद झालेलो असतो त्यावेळी स्वतःवर विश्वास असणं हे खूप महत्वाचं आहे.

रुढार्थाने हे जरी बालगीत असलं तरी खूप मोठा आशय लाभलाय त्याला; त्यामुळे
बालगीतं ही पोरांसाठी असली तरी हा 'पोरांचा खेळ' मात्र नाही हे पटतं. :) 
 

गायिका: आशा भोसले
संगीतकार: श्रीनिवास खळे
गीतकार: ग. दि. माडगूळकर
 
हे गाणे इथे ऐकू शकता: